बुधवार, २१ ऑगस्ट, २०१३

शक्ती v/s विचार ........

दरवर्षी साधारण पावसाळा सुरु झाला कि शहरात माहुती हत्तींना घेऊन येतात.कधी एक माहुती आणि हत्ती असतो, तर कधी दोन माहुती आणि दोन हत्ती असतात.

(Image Source : My own Photography Blog)
 मी हल्ली रोज एक हत्ती बघतेय अगदी स्टेशनच्या गजबजलेल्या रोड वर. पावसाळ्यात ओले  झालेले खड्डेयुक्त रस्ते, प्रचंड गर्दी, बस,रिक्षा आणि गाड्यांचे traffic आणि त्यात निर्विकारपणे वाट काढत जाणारा हत्ती , माहुती ज्या दिशेने सांगेल त्या दिशेने. लोकं पैसे देतात कोणी नाणी तर कोणी नोटा, हत्ती सोंड वर करून ते त्याच्यावर विराजमान झालेल्या माहुतीला पोहचवतो. कोणी हत्तीला केळ देतो तर कोणी ऊस.एखादा चांगला दुकानदार किंवा माणूस बादलीभर पाणी देखील देतो. माहुती अंकुश देतो परत परत रस्ता मार्गक्रमण करण्यासाठी.

गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१३

चांगला आज (वर्तमान) जगण्यासाठी......

 (Image source: my photography blog)

सर्वांनाच चिंतामुक्त आणि तणाव विरहित जगण्याची इच्छा असते, पण सर्वच हे करण्यात यशस्वी होतातच असं नाही.....काही गोष्टी केल्या तर आपण वर्तमानाची काळजी सोडून आनंदाने वर्तमान जगू शकतो. त्या गोष्टी म्हणजे :-

नेतृत्व......

उत्तम नेतृत्व असेल आणि त्या सोबत योग्य योजना आखल्या गेल्या असतील तर प्रगती आणि विकास लवकर घडतो.

शनिवार, ३ ऑगस्ट, २०१३

परत स्थिर होताना .......


यंदाचा पावसाळा गेल्यावर्षीच्या तुलनेत खूप जास्त आहे. पाऊस आला तरी .... आणि नाही आला तरी..... प्रश्न काही सुटत नाहीत. एप्रिल मे महिन्यात प्रचंड दुष्काळ होता. मी एका गावात (बुलढाणा जिल्ह्यातील)गेली होती तिकडे महिन्यातून एकदाच पाणी यायचं त्यावेळी.... आणि आता जून-जुलै मध्ये इतका पाऊस पडलाय कि त्याच बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामस्थ आणि शेतकरी ओला दुष्काळ सरकार जाहीर करेल याकडे लक्ष लावून आहेत. गेल्या वर्षी विदर्भात पाऊस फार कमी पडला होता. त्यामुळे कठीण दुष्काळाचा सामना करावा लागला होता.
यंदा अतिवृष्टीमुळे नागपूर,चंद्रपूर, आणि इतर बऱ्याच ठिकाणी पूरसदृश स्थिती आहे. काही गावं पाण्याखाली गेलीयेत तर काही गावांचा संपर्क तुटलाय. खरंच किती प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. आणि किती प्रकारची संकट सहन करून देखील त्यांना योग्य मोबदला मिळतच नाही.